आटपाडी (प्रतिनिधी) : केळी हे अधिक नफा मिळवून देणारे पीक असून योग्य नियोजन आणि तांत्रिक ज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळविता येते. मात्र, पीक व्यवस्थापनात झालेली थोडीशी चूकही मोठ्या नुकसानीचे कारण ठरू शकते. म्हणूनच शेतकऱ्यांनी केळी लागवडीपासून ते फळांच्या छाटणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

शेतकरी प्रशिक्षणाचे विशेष सत्र…
शेतीमध्ये चांगल्या प्रतीची रोपे, तांत्रिक बाबींचे ज्ञान, पिकाचे संरक्षण, लागवड पद्धती याबाबत सविस्तर माहिती देणारे “निर्यातक्षम केळी चर्चासत्र २०२५” हे शेतकरी प्रशिक्षणाचे विशेष सत्र येत्या रविवारी, दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता जाधव महाराज मठ, आटपाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.

कृषीमित्र अजय आदाटे यांचे विशेष मार्गदर्शन..
या चर्चासत्राचे आयोजन कृषिमित्र अक्षय सागर (महाराष्ट्र कृषी उद्योग समूह, आटपाडी) यांच्या वतीने करण्यात आले असून, कृषिमित्र अजय आदाटे हे ‘केळी निर्यात तंत्रज्ञान’ या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.उत्पादनात वाढ, खर्चात बचत आणि केळीचे निर्यातक्षम उत्पादन याबाबत उपयुक्त माहिती मिळविण्यासाठी परिसरातील सर्व केळी बागायतदार शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

चर्चासत्राची माहिती:
विषय: निर्यातक्षम केळी व केळी महापीक
आयोजक: महाराष्ट्र कृषी उद्योग समूह, आटपाडी व ॲग्रीकॉस एक्सपोर्ट्स प्रा. लि., पुणे
स्थळ: जाधव महाराज मठ, दिघांची रस्ता, आटपाडी
वेळ: रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ – सकाळी १०.०० वाजता
या चर्चासत्राचा केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क:
महाराष्ट्र कृषी उद्योग समूह, आटपाडी
(अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधावा)























