सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क…
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसे जिल्हा परिषद गटाला भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे प्रतिपादन नंदेश्वर येथील सुशिक्षित मतदार एलआयसी विमा प्रतिनिधी दादासाहेब मळगे यांनी केले आहे.

वर्षानुवर्षे भोसे जिल्हा परिषद गटात प्रश्न प्रलंबित…
गेल्या अनेक वर्षांपासून भोसे जिल्हा परिषद गटातील आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते आदी मूलभूत सुविधा प्रलंबित अवस्थेत आहेत. या सर्व समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज असल्याचे मत मळगे यांनी व्यक्त केले.
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर..
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले, सर्वसामान्यांना वेळोवेळी मदतीचा हात देणारे अनिल सावंत हेच असे व्यक्तिमत्व आहे जे भोसे गटातील जनतेच्या समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडू शकतात. त्यामुळे समविचारी आघाडी असो वा महाविकास आघाडी, अनिल सावंत यांनाच उमेदवारी देऊन या गटाच्या विकासाचा मार्ग मोकळा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अनिल सावंत यांच्या नेतृत्वाची गरज..
मळगे यांनी पुढे सांगितले की, भोसे जिल्हा परिषद गटाचा विकास, तरुणांच्या रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांच्या अडचणी यावर ठोस उपाययोजना करण्याची क्षमता अनिल सावंत यांच्या नेतृत्वात आहे. त्यामुळे त्यांचे नेतृत्व मिळणे ही काळाची गरज आहे.
























