Homeउद्योगजरा धीर धरा.. आपल्या माथ्यावरचा दुष्काळग्रस्त कलंक मिटणार म्हणजे मिटणार - आ....

जरा धीर धरा.. आपल्या माथ्यावरचा दुष्काळग्रस्त कलंक मिटणार म्हणजे मिटणार – आ. समाधान आवताडे

जरा धीर धरा.. आपल्या माथ्यावरचा दुष्काळग्रस्त कलंक मिटणार म्हणजे मिटणार – आ. समाधान आवताडे
* नंदेश्वर येथील गुरुमाऊली पतसंस्थेचे उद्घाटन संपन्न

नंदेश्वर /प्रतिनिधी
विधानसभेत पाय ठेवल्यानंतर पहिल्यांदा मी भाषण केले होते की आम्ही मंगळवेढेकर दुष्काळग्रस्त हा शिक्का माथ्यावर घेऊन जरी जन्माला आलो असलो तरी दुष्काळग्रस्त म्हणून मरणार नाही. त्यासाठी अखंडपणे सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. थोडा धीर धार आपल्या माथ्यावरचा दुष्काळग्रस्त हा कलंक मिटणार आहे. मंगळवेढा उपसा सिंचन ही २४ गावांची योजना पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे. असे प्रतिपादन आ. समाधान आवताडे यांनी केले. नंदेश्वर ता. मंगळवेढा येथील गुरुमाऊली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील तनिष आयकॉन गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन रुक्मिणी दोलतडे होत्या. यावेळी देवसागर साधक ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर लाड, दामाजीचे संचालक औदुंबर वाडदेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे, शिवसेना शहरप्रमुख प्रतिक किल्लेदार, माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे, उपसरपंच आनंदा पाटील, गुरुमाऊली दूध संस्थेचे चेअरमन बाबासाहेब मोटे, राहुल मोटे हे उपस्थित होते.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;

यावेळी बोलताना आमदार आवताडे म्हणाले की, शहरांमध्ये अगदी मोजक्या प्रमाणात दिसणाऱ्या पतसंस्था आज गावोगावी रोज नव्याने स्थापन होताना दिसत आहेत. शेतकरी, व्यवसायिक, उद्योजक यांच्याबरोबर सर्वच क्षेत्रातील लोकांना पतसंस्था या सध्या चांगल्या पद्धतीने पतपुरवठा करून सर्वांच्याच विकासात भर टाकताना दिसत आहेत. पण पतसंस्था यशस्वीपणे चालण्यासाठी वेळेत कर्ज फेडणारा कर्जदार मिळणे आवश्यक आहे. नंदेश्वर येथील बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा स्थलांतरित होत असताना मी अगदी जिल्हाधिकाऱ्यांपासून ते जिथे जिथे योग्य पाठपुरावा करायचा आहे तिथे केला आणि बँक तूर्तास तरी स्थलांतरित होण्यापासूनच थांबली आहे. पण बँक स्थलांतरित होण्यापाठीमागची कारणे शोधून त्यावरती उपाय होणे गरजेचे आहे.
यावेळी कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे, माजी उपसरपंच राहुल कसबे, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक समितीचे माजी सदस्य आकाश डांगे, जयसिंग कांबळे, दत्ता साबणे, पोपट बंडगर, सुभाष खांडेकर, दिगंबर गरंडे, बाबुराव चौंडे हे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औदुंबर कुंभार यांनी केले तसेच प्रास्ताविक श्री माऊली पतसंस्थेचे चेअरमन आण्णासाहेब बंडगर यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन माजी ग्रा.पं. सदस्य गुरुलिंग दोलतडे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...
error: Content is protected !!