सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क:
सध्या मंगळवेढा तालुक्यामध्ये सिंगल फेज लाईट कोणतेही कारण न सांगता बंद केली जात आहे तसेच थ्री फेज लाईट व्यवस्थित पुरवठा केला जात नाही. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत सकाळच्या वेळेस गाई गुरांच्या धारा काढण्यासाठी जवळजवळ सगळीकडे मशीन आहेत या मशीन व्यवस्थित चालत नाहीत. कडबा कुट्टी ,लाईटचा पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळे चालत नाही तसेच थ्री फेज लाईट व्यवस्थित तालुक्याला मिळत नाही. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन ग्रामीण भागात होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत साळे यांनी केली.

अचानक लोडशेडिंग…शेतकऱ्यांचे हाल….
मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज उपअभियंता मरळी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने शहराध्यक्ष राहुल घुले, प्रदेश सचिव रवीकिरण कोळेकर, संदीप फडतरे, मनोज माळी, आबा खांडेकर, अभिमन्यू तात्या बेद्रे, राजू ठेंगील, संतोष क्षिरसागर, ज्ञानेश्वर सोरडीकर, येसापा आकळे आदी उपस्थित होते.

बोलताना प्रदेश सचिव रविकरण कोळेकर म्हणाले की, हा दुष्काळी भाग आहे मुळातच शेतीसाठी वीज कमी लागते यात सरकार दृष्ट भावनेतून ही वीज वेळेवर सोडत नसेल तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे हा फार मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपलब्ध झाला आहे.शेतकऱ्यांची अगोदरच शेती हा व्यवसाय तोट्यात चालत असताना या माहिती सरकारने शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा लावली आहे लाईटचा पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















