Homeराजकीयपाणंद रस्त्यांसाठी मुरूम टाकायला परवानगीची गरज नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...

पाणंद रस्त्यांसाठी मुरूम टाकायला परवानगीची गरज नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य,कुर्डू प्रकरणानंतर प्रशासनाला स्पष्ट आदेश

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क

राज्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाणंद रस्त्यांवर मुरूम टाकण्यासाठी यापुढे कोणतीही शासकीय परवानगी आवश्यक नाही, असा थेट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

सोलापूर जिल्ह्यातील वादग्रस्त कुर्डू मुरूम प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या भूमिकेवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देत सांगितले की, “पाणंद रस्त्यांवर मुरूम टाकण्यास कोणतीही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.”

यावेळी बोलताना अजित पवार यांनी मिश्किलपणे, “हा निर्णय सोलापुरातही लागू करा, तिथे सांगायला विसरू नका,” असे म्हणत उपस्थितांमध्ये हशा पिकवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या टिप्पणीवर मोठ्याने हसले.

कुर्डू प्रकरणाची पार्श्वभूमी
काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात बेकायदा मुरूम उपसा थांबवण्यासाठी गेलेल्या DYSP कृष्णा यांना थेट अजित पवार यांनी फोनवरून कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते. हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर टीकेची झोड उठली. या प्रकरणामुळे त्यांना जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करावी लागली होती.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा…
या नव्या निर्णयामुळे राज्यातील ग्रामस्थांना व स्थानिक प्रशासनाला पावसाळ्यात खराब होणाऱ्या पाणंद रस्त्यांवर त्वरित मुरूम टाकण्याची मुभा मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे वाहतूक व दळणवळणाचे प्रश्न काही अंशी सुटणार असून, शासनाकडून लवकरच या आदेशासंदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR) जारी होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...
error: Content is protected !!