Homeताज्या बातम्याचक्क मतदान होऊन झाली तंटामुक्ती अध्यक्षाची निवड...या गावात झाले तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठी...

चक्क मतदान होऊन झाली तंटामुक्ती अध्यक्षाची निवड…या गावात झाले तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठी मतदान

(टीम सोलापूर आजतक)
गावातील वादविवाद, तंटे गावातच मिटावेत, शांतता व सलोखा टिकून रहावा यासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची संकल्पना राज्यात राबविली जात आहे. मात्र, या समितीच्या अध्यक्षांची निवड करताना अनेकदा चक्क तुंबळ हाणामारी, भांडणे झालेले पाहिले आहे. पण निवडणुकीतून तंटामुक्ती अध्यक्षाची निवड होणे हा प्रकार पहिल्यांदाच अनुभवायला मिळाला आहे.

तावशी (ता.पंढरपूर) येथे आयोजित केलेल्या सभेत अभूतपूर्व गदारोळ झाला. अखेर मतदान घेण्यात आले. मतमोजणीअंती समितीच्या अध्यक्षपदी गतवेळचे अध्यक्ष सिद्धेश्वर यादव हे विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.तावशी येथील ग्रामपंचायतीच्या आवारात तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.

यासाठी उमेदवारांनी प्रचार केल्याने कमालीची चुरस निर्माण होऊन निवडीला ग्रामपंचायत निवडणुकीचे स्वरूप आले. ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी या प्रक्रियेत उत्साहाने सहभाग घेतला. अखेर या निवडणुकीत सिद्धेश्वर यादव यांचा विजय झाला. या समितीचे अध्यक्षपद गावातील ज्येष्ठ, जाणकार, सामाजिक कार्यकर्त्यांना बहाल केले जाते. मात्र, तावशी येथे चक्क निवडणूक प्रक्रिया राबवावी लागल्याने सर्वत्र हा चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामसेविका सगुना सरवदे, तलाठी आनंद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...
error: Content is protected !!