पंढरपूर शहरातील शंभुराजे कुस्ती संकुलाचे संस्थापक माऊली काळे पैलवान यांचा अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश..
(टीम सोलापूर आजतक)
पंढरपूर (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याचे घोषित केले आहे. पंढरपूर शहरात पाऊल ठेवल्यापासूनच त्यांनी अनेक मित्रांची जुळवा जुळव केली आहे. याच मैत्री पर्वाचा त्यांना आगामी राजकारणात फायदा होणार आहे. तीन ऑगस्ट रोजी मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अजून एक दोस्ताना घट्ट केला आहे. शिवशंभो तालीमचे संस्थापक वस्ताद माऊली काळे यांच्याशी मैत्रीची वीण घट्ट केली आहे. माऊली काळे हे पंढरपूर शहरातील गोविंदपुरा भागातील प्रसिद्ध तालीम व्यक्तिमत्व आहे. चालवत असल्याने अनेक आजी-माजी मल्लांशी त्यांची जवळीक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेऊन त्यांनाच पंढरपूर अनिल सावंत यांनी नगरपरिषद निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. पंढरपूर शहरातील अनिल सावंत यांच्या सदनात झाला. यावेळी माऊली काळे यांच्या समवेत अनेक मल्ल आणि मित्रमंडळी उपस्थित होती. यावेळी राष्ट्रवादी नेते अनिल सावंत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोठ्या ताकदीने लढवणार असल्याचे घोषित केले. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह अनिल सावंत स्वतः माऊली काळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास उपस्थितांना दिला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल सावंत, अक्षय गंगेकर, चंद्रशेखर कोंडूभैरी, संतोष रंदवे, सिताराम भगरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, प्रथमेश पाटील, संदीप शिंदे, भैय्या संगीतराव, भैय्या गंगथडे, महेश घाडगे, अतुल मोरे, जमीर इनामदार, अक्षय नवत्रे, सचिन काळे, श्याम गोगाव, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
**************************
भैरवनाथ उद्योग समूहाचे संचालक अनिल सावंत यांनी पंढरपूर शहरात पाऊल ठेवल्यापासूनच येथील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतला आहे. म्हणूनच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. आता येथील सर्वच निवडणुकांमध्ये उतरून राष्ट्रवादीचा गट मजबूत करण्याचे धोरण त्यांनी आखले आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय मंडळींना जवळ घेतले आहे. शिवशंभो तालीमचे संस्थापक माऊली काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणून त्यांनी येथील सत्ताधारी मंडळींना मोठा शह दिला आहे.




















