Homeक्राईमबँकेवर दरोडा!! स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत कर्मचाऱ्यांची हातपाय बांधून पाच दरोडेखोरांनी...

बँकेवर दरोडा!! स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत कर्मचाऱ्यांची हातपाय बांधून पाच दरोडेखोरांनी लुटली आठ कोटींची रोकड व ५० किलो सोने

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क:
सध्या चोरी व लुटमारीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, विजयपूर जिल्ह्यातील चडचण शहरात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. चडचण येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत अज्ञात पाच बंदूकधारी दरोडेखोरांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सुमारे आठ कोटी रुपयांची रोकड आणि ५० किलो सोने लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कर्मचाऱ्यांना बंदीस्त करून तिजोरी साफ..
मिळालेल्या माहितीनुसार, बँकेतील नियमित कामकाज संपल्यावर काही कर्मचारी उर्वरित काम करत असताना, एका कारमधून आलेल्या पाच सशस्त्र दरोडेखोरांनी बँकेत घुसून सर्व कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या धाकाने हातपाय बांधून एका खोलीत बंद केले. त्यानंतर तिजोरीची चावी मिळवून त्यांनी बँकेत असलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटले. दरोडेखोर हे अत्यंत नियोजित पद्धतीने आणि जलद कारवाई करून पसार झाले.

पोलिस प्रशासन सतर्क, सीमाभागात अलर्ट…
दरोडेखोर हे महाराष्ट्राच्या दिशेने कारमधून निघाले असल्याचा पोलिसांना संशय असून, कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना तत्काळ सतर्क केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवरील पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट..
घटनेची माहिती मिळताच विजयपूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निम्बर्गी, इंडी विभागाचे उपअधीक्षक आर. जगदीश आणि चडचणचे सीपीआय सुरेश बेंडेगुंबाळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती, आणि पोलीस अधिक तपास करत आहेत.

शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण…
ही घटना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, मुख्य रस्त्यावर असलेल्या बँकेत घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, लवकरच आरोपींचा माग काढला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपशीलांसाठी पोलिस तपास प्रगतीकडे लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना तत्काळ कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...
error: Content is protected !!