Homeताज्या बातम्याअनिल सावंतांना पवार साहेबांचा आशीर्वाद; साहेबांचा अपमान करणाऱ्यांना त्याची जागा दाखवा, ...

अनिल सावंतांना पवार साहेबांचा आशीर्वाद; साहेबांचा अपमान करणाऱ्यांना त्याची जागा दाखवा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भगीरथ भालकेंवर सडकून टीका

पंढरपूर /प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत हेच आहेत. सावंत यांना पवार साहेबांचा आशीर्वाद आहे हे मतदारांनी लक्षात ठेवावे. भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती. मात्र पवार साहेबांनी निर्णय घ्यायचा अगोदरच त्यांनी वेगळी भूमिका घेतली. पवार साहेबांच्या निर्णयाची वाट न बघता इतर पक्षातून उमेदवारी घेत पवार यांचा अपमान करणाऱ्या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याची ही वेळ आहे‌ असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी केली.


छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवतीर्थ पंढरपूर या ठिकाणी 15 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. प्रचार सभेत जयंत पाटील बोलत होते.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे, पक्षनिरीक्षक शेखर माने, राहुल शहा, रवी पाटील, वसंतनाना देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, शहराध्यक्ष सुभाष भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, रवी मुळे, डॉ.संजयकुमार भोसले, संतोष नेहतराव, गंगेकर, सुधीर भोसले, सुधील अभंगाराव, , प्रथमेश पाटील , चंद्रशेखर कोंडुबहिरे, दिपकदादा वाडदेकर, सागर पडगळ, संजय शिंदे, मुन्ना भोसले,महिला आघाडीच्या पदाधिकारी सुवर्णाताई शिवपुरे, पूनम अभंगराव, राजश्री ताड, वृषाली इंगळे, शुभांगी ताई, साधना राऊत , चारुशीला कुलकर्णी, पूर्वा ताई, अनिता पवार ,सुनंदा उमाटे , रेखा ताई, काजल भोरकडे यांचेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, महागाई, शेतकरी संतप्त आहे. मात्र या मूलभूत समस्यांकडे बघायला भाजपला वेळ नाही. भाजप फक्त जाती धर्मांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहे. म्हैसाळच्या पाण्याचा प्रश्न आम्ही सोडविणार. मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न आमचेच सरकार सोडवणार. तसेच पंढरपूर शहर आणि तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. समोर जरी काँग्रेसचा उमेदवार असला तरी या लढतीचे विश्लेषण करायचं झालं तर ही मैत्रीपूर्ण लढत होईल. मात्र अनिल सावंत यांना शरद पवारांचे आशीर्वाद आहेत, ते विसरू नका.
*************
कामचुकार सालगडी बदला
गतवेळी विद्यमान लोकप्रतिनिधीला माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडून आणले. पण यावेळी मात्र प्रशांत परिचारक यांना उमेदवारी देताना याच माणसाने खोडा घालत स्वतःला उमेदवारी मिळवून घेतली. ही घटना परिचारकांचे समर्थक विसरले नाहीत. विद्यमान लोकप्रतिनिधींनी जसे परिचारकांना फसवले तसेच ज्या मतदारांनी वादळात दिवा लावला त्या मतदारांना देखील फसविले आहे. त्यामुळे सालगडी कामचुकारपणा करायला लागल्यानंतर त्याला बदलले पाहिजे. पंढरपूर मंगळवेढ्यातील जनतेने देखील यंदा सालगडी बदलला पाहिजे. तसेच नोटरीचेबल असणारा माणूस मतदारसंघाचा विकास कितपत करेल याविषयी मतदारांच्या मनात शंका आहेत. त्यामुळे पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील जनतेने यावेळी माझ्यावर विश्वास ठेवून मला एकदा संधी द्यावी मी मतदार संघात प्रश्न शिल्लक ठेवणार नाही.
अनिल सावंत
उमेदवार
*************
बटेंगे तो कटेंगे नाहीतर पढेंगे तो बचेंगे
देशात आणि राज्यात भाजपचीच सत्ता आहे तरीही हिंदू कसा काय धोक्यात आहे. भाजपाने राज्यात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी बटेंगे तो कटेंगे ही नवीन आयडिया काढली आहे. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणारी भाजपा अठराव्या शतकातून बाहेर निघायला तयार नाही. 21 व्या शतकात पढेंगे तो बचेंगे यानुसार कार्य करत गेले तरच समाजाचा विकास होणार आहे. पण भाजपाला केवळ जातीय तेढ निर्माण करून सत्ता मिळवायची आहे असेही यावेळी बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नंदेश्वर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्रलंबित प्रश्नांचे काय???

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध राजकीय गट व नेतेमंडळींनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नंदेश्वर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्रलंबित प्रश्नांचे काय???

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध राजकीय गट व नेतेमंडळींनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...
error: Content is protected !!