नंदेश्वर (प्रतिनिधी) भैरवनाथ शुगरचे संस्थापक प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पाठीमागील १० वा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आहेत. तसेच या वर्षी ऊसाची क्षेत्र कमी प्रमाणात उपलब्ध असुन नोंदीचा सर्व ऊस गाळपास आणण्यात येईल. आजपर्यंत ज्या विश्वासार्हतेवर कारखान्याने गळीत हंगाम पूर्ण केलेले आहेत त्याच विश्वासावर चालू गळीत हंगाम पूर्ण होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. यासाठी लागणारी सर्व ऊस तोडणी-वाहतूक यंत्रणा कार्यान्वित असल्याचे सांगण्यात आले. कारखान्याला ४ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट आहे ते आम्ही पूर्ण करू असे आश्वासन व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी यावेळी दिले.
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगरचा ११ वा गळीत हंगाम व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या शुभ हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते. सुरूवातीस ऊस वजन काटा पूजन व ऊसाने भरलेल्या वाहनांचे विधीवत पूजन व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. सत्यनारायण पुजा हनुमंत आसबे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुहाणी यांचे शुभहस्ते करण्यात आली.
यावेळी श्रीपती माने, रामचंद्र जाधव, चंद्रकांत देवकर, तानाजी चव्हाण, जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, चीफ अकौंटंट देवानंद पासले, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण, शेतकी अधिकारी कृष्णदेव लोंढे, शेतकी अधिकारी रमेश पवार,एच आर मॅनेजर संजय राठोड,केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील, ई.डी.पी मॅनेजर गजानन माने-देशमुख,स्टोअर मॅनेजर केदार साबने, सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे,कार्यालय अधीक्षक अभिजीत पवार व सिद्धेश्वर गुंड, योगेश राहिगुडे यांच्यासह परिसरातील सरपंच, मान्यवर,पत्रकार बांधव व ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी-वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.
