सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क, नंदेश्वर | 2 ऑक्टोबर 2025
सध्याचा तरुण व्यवसायाकडे वळतो आहे, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. युवक स्वतःच्या पायावर उभा राहत असताना देशाच्या आर्थिक प्रगतीस हातभार लावत आहे. युवकांचा व्यवसाय कडे वाढलेला कल हा देशाच्या प्रगतीसाठी सकारात्मक आहे असे प्रतिपादन भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी केले. नंदेश्वर ता.मंगळवेढा येथे हॉटेल दोस्ती ढाब्याच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते
नंदेश्वरी येथील हॉटेल दोस्ती ढाब्याचे उद्घाटन भव्य स्वरूपात पार पडले. या प्रसंगी भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत आणि श्री बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज प्रमुख उपस्थितीत होते. हॉटेलचे मालक युवराज बंडगर यांच्या आई-वडील व चुलत भाऊ-बहिण यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले.

या कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी उपसभापती दादासाहेब गरंडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, माजी सरपंच गेणा दोलतडे, माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे, उपसरपंच आनंदा पाटील यांची उपस्थिती लाभली होती.यावेळी बोलताना बाळासाहेब महाराज म्हणाले की, नोकरीपेक्षा व्यवसाय कधीही चांगला आहे. व्यवसाय करत असताना मालक स्वतःचा प्रपंच करतोच मोठा करतोच, त्याबरोबरच त्या व्यवसायाशी संलग्न असलेल्या अनेक कुटुंबांची व्यवसायातून गुजरान होत असते.

मान्यवरांची उपस्थिती..
कार्यक्रमाचे संयोजन अतिशय उत्तम पद्धतीने पार पडले. उपस्थित सर्व मान्यवरांनी युवराज बंडगर यांना पुढील व्यवसायात यशाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औदुंबर कुंभार यांनी केले.
यावेळी भैरवनाथ शुगरचे शेती अधिकारी कृष्णदेव लोंढे, नानासाहेब बंडगर, कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे, माजी उपसरपंच राहुल कसबे, माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुलिंग दोलतडे, ग्रामपंचायत सदस्य पिंटू बंडगर, संतोष कांबळे, आप्पासाहेब मेटकरी, तानाजी मोटे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बजरंग चौगुले, दामाजीचे माजी संचालक संभाजी लवटे, उत्तम बेलदार, आप्पासाहेब मेटकरी, शिवसेना उपतालुकाप्रमुख संभाजी खापे, काँग्रेसचे नेते आबासाहेब पाटील, बाबुराव ठोंबरे उपस्थित होते.






















