Homeराजकीयसोलापूर भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्तक्षेपावरून आ.विजयकुमार देशमुख यांची...

सोलापूर भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्तक्षेपावरून आ.विजयकुमार देशमुख यांची उघड नाराजी..

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क
विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील ना. जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र पदाधिकाऱ्यांच्या निवडीपासून ते नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांपर्यंत पालकमंत्री गोरे यांचा वाढता हस्तक्षेप सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या अनेक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना रुचलेला दिसत नाही.

पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांना पक्षांतर्गत विरोध
माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्यासह भाजपच्या अनेक लोकप्रतिनिधींमध्ये व व तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये पालकमंत्री यांच्या या हस्तक्षेपाबाबत नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये ज्या नगरपालिकांची जबाबदारी पालकमंत्री गोरे यांच्याकडे होती, त्या सर्व ठिकाणी भाजपला पराभव स्वीकारावा लागला. या निकालांनंतर पालकमंत्री गोरे यांच्या भूमिकेवर पक्षांतर्गत तसेच राजकीय विश्लेषकांकडून टीका होत आहे.

माजी पालकमंत्री,माजी सहकार मंत्र्यांचा विद्यमान पालकमंत्र्यांना उघड विरोध
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील राजकारण तापू लागले आहे. आमदार विजयकुमार देशमुख व माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी पालकमंत्री गोरे यांच्या हस्तक्षेपाला उघड विरोध दर्शवत थेट इशारा दिला आहे. महापालिका निवडणुकीत जर पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि ते अन्य पक्षातून किंवा अपक्ष म्हणून उभे राहिले, तर त्यांना मदत करावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

वेळेत उपायोजना करा, भाजप कार्यकर्त्यांची मागणी
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात संयमी आणि मितभाषी म्हणून ओळखले जाणारे आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही, अशा चर्चांना जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने वेळेत दखल घेऊन योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी पक्षातील कार्यकर्त्यांकडून होत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सोलापूर भाजपमधील ही अंतर्गत अस्वस्थता पक्षासाठी कितपत अडचणीची ठरणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...
error: Content is protected !!