Homeराजकीयमोठे बळ!!स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी अनिल सावंत यांना मोठे बळ; भैरवनाथ शुगर...

मोठे बळ!!स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी अनिल सावंत यांना मोठे बळ; भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या चेअरमनपदी निवडीने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क…
(मंगळवेढा /प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि नावाजलेल्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या चेअरमनपदी अनिल सावंत यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीनंतर त्यांच्यावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सावंत यांच्या चेअरमनपदी झालेल्या निवडीने केवळ औद्योगिक क्षेत्रातच नव्हे, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातही त्यांना मोठे बळ मिळाले आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात यावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

मान्यवरांनी केले अनिल सावंत यांचे कौतुक..
या यशानंतर सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, दामाजी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, संचालक बसवराज पाटील,सांगोल्याचे विष्णू मालक देशमुख ,आदित्य फत्तेपूरकर नगरसेवक,विनोद लटके तसेच राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी यांनी अनिल सावंत यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.

समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण…
या निवडीमुळे अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ शुगर उद्योग समूहाची वाटचाल अधिक प्रभावीपणे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. या निवडीनंतर अनिल सावंत यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे अशी चर्चा सध्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...
error: Content is protected !!