मंगळवेढा(प्रतिनिधी)
कायद्याचे रक्षण करण्यासाठी गावोगावी शासनाने जे पोलीस पाटील नेमले आहेत ते पोलीस पाटीलच आज कायदा मोडताना दिसत आहेत. अशा पोलीस पाटलांवर कारवाई करण्यापेक्षा काही पोलीस अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत अशा सर्वांवर कारवाई व्हावी. इतकेच नाहीतर मंगळवेढा तालुक्यातील तब्बल २९ पोलीसपाटील आमच्या रडारवर आहेत त्यांच्या विरोधात लवकरच पुरावे देऊन कारवाईसाठी मागणी करणार असल्याचे निवेदन मंगळवेढा तालुक्यातील प्रहार संघटनेच्या वतीने प्रांताधिकार्यांना देण्यात आले आहे. लवकरात लवकर संबंधितावर कारवाई नाही झाली तर मंगळवेढा तालुक्यातील विविध कार्यालयासमोर भांडणात आंदोलन करणार असल्याचा इशारा तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देतेवेळी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी, तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, सचिन सरवदे, अण्णासो पाटील, रोहिदास कांबळे उपस्थित होते.

यामध्ये जे पोलीस अधिकारी पोलीस पाटील यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांच्यावरही प्रहार आवाज उठवणार आहे. कारण चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम मंगळवेढा पोलीस स्टेशन मधील कर्मचारी करीत आहेत. हे स्पष्ट दिसून आले आहे त्यामुळे आता लमाणतांडाचे पोलीस पाटील हे मोठ्या संकटात सापडले आहेत. तर दुसरीकडे भालेवाडीचे पोलीस पाटील यांची यांनी तर अजब गावची गजब कहानी अशी कथाच लिहिली आहे यांनी थेट शासनाची फसवणूक करत ठेकेदार बनला आहे. यांनी पोलीस पदाचा राजीनामा देऊन ठेकेदारी हा व्यवसाय करायचा पण त्यांनी दोन्ही व्यवसाय सुरू केली आहेत.

त्यांनी मारोळी येथे प्लेविंग ब्लॉक बसविणे, गाव अंतर्गत सीसीची कामे करणे, लघुनळ पाणीपुरवठा करणे, शौचालय बांधणे, रस्ते करणे अशी अनेक छोटी मोठी कामे अनेक वर्षे झाली तो करीत आहे. त्यामुळे याचीही हकालपट्टी करणे गरजेचे आहे. पोलीस पाटील पदावर ती असताना कोणत्याही निवडणुकीत भाग घ्यायचा नसतो पण हे दोघेही जणू स्वतः निवडणूक लढवीत आहोत असे म्हणून भाग घेत असतात. त्यामुळे या दोघांचीही गैरवर्तणूक सिद्ध झाली आहे. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी प्रहारने आता रीतसर मागणी केली आहे. त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील २९ पोलीस पाटील हे प्रहारच्या रडारवर आहेत असेही मंगळवेढा तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितले.





















