Homeताज्या बातम्यानंदेश्वर-जुनोनी मार्गालगतची धोकादायक विहीर ग्रामस्थांच्या चिंतेचा विषय; तातडीने बुजविण्याची मागणी, शाळकरी विद्यार्थी,...

नंदेश्वर-जुनोनी मार्गालगतची धोकादायक विहीर ग्रामस्थांच्या चिंतेचा विषय; तातडीने बुजविण्याची मागणी, शाळकरी विद्यार्थी, नागरिक आणि बुद्ध विहारात येणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर गावालगत तसेच नंदेश्वर-जुनोनी मार्गालगत असलेली एक जुनी विहीर सध्या ग्रामस्थांसाठी मोठा धोक्याचा विषय ठरत आहे. ही विहीर अगदी रस्त्याच्या कडेला असून तिच्या आसपास कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे या विहिरीपासून काही अंतरावरच नंदेश्वर गावातील श्री बाळकृष्ण विद्यालय असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या परिसरातून राज्य महामार्गाचे काम सुरू असून, विहिरीच्या अगदी कडेलाच रस्ता विकसित केला जात आहे. मात्र रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वी या धोकादायक विहिरीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

तांदुळवाडीसारखी दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना करा
अलीकडेच तांदुळवाडी येथे रस्त्यालगत असलेल्या विहिरीत बुडून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात रस्ता बांधकामादरम्यान ठेकेदाराने पुरेशी सुरक्षा उपाययोजना न केल्याचा आरोप होत असून संबंधित ठेकेदारावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील अशा धोकादायक विहिरींकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर नंदेश्वर येथील विहिरीबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. “तांदुळवाडीसारखी दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना करा,” अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

याआधी टळली होती मोठी दुर्घटना
विशेष म्हणजे सुमारे दोन वर्षांपूर्वी नंदेश्वरहून मंगळवेढाकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली एसटी बस या विहिरीत कोसळता-कोसळता थोडक्यात बचावली होती. त्या बसमध्ये जवळपास ३० प्रवासी होते. त्या वेळी मोठी दुर्घटना टळली असली, तरी हा प्रकार ग्रामस्थांच्या स्मरणात आजही ताजा आहे.

किरकोळ उपाययोजना न करता विहीर बुजविण्याची ग्रामस्थांची मागणी
विहिरीच्या एका बाजूला रस्ता असून दुसऱ्या बाजूला नंदेश्वर येथील बौद्ध बांधवांनी उभारलेले बुद्ध विहार आहे. येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांवेळी लहान मुलांची मोठी उपस्थिती असते. त्यामुळे या विहिरीमुळे त्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. याशिवाय गावालगतच वस्ती असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, या विहिरीचा सध्या गावाला कोणताही उपयोग नसून केवळ सुरक्षा कठडा किंवा भिंत बांधून हा प्रश्न सुटणार नाही. भविष्यातील मोठा धोका टाळण्यासाठी ही विहीर पूर्णपणे बुजविणे हाच एकमेव कायमस्वरूपी उपाय असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. आता प्रशासन व संबंधित विभाग याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतात आणि रस्ता पूर्ण होण्यापूर्वी या विहिरीचा प्रश्न मार्गी लागतो का, याकडे संपूर्ण नंदेश्वर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कौतुकास्पद…जि.प. प्राथमिक शाळा बंडगरवाडी (नंदेश्वर) च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व मंथन परीक्षेत घवघवीत यश

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बंडगरवाडी येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ तसेच मंथन राज्यस्तरीय...

नंदेश्वर ग्रामपंचायतीची निवडणूक वादळी ठरणार? दुरंगी, तिरंगी की चौरंगी लढत? इच्छुकांनी सुरू केली जोरदार...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीची चाहूल लागताच गावातील राजकीय वातावरण तापू लागले असून, यंदाची निवडणूक चुरशीची आणि वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त...

शिरनांदगी येथे पोलीस बांधवांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न,राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य...

नंदेश्वर / प्रतिनिधी : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिरनांदगी येथे भव्य मिरवणूक काढून गावातील नवनियुक्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषद शाळेच्या...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; इच्छुकांमध्ये उत्सुकता, काहींमध्ये नाराजी

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदस्य पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, चक्रानुक्रमानुसार जाहीर झालेल्या आरक्षणामुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

पंढरपूरच्या सांस्कृतिक वारशासोबत औद्योगिक विकासाचीही गरज; शिवसेना नेते अनिल सावंत यांची उद्योगमंत्री ना. उदय...

पंढरपूर / प्रतिनिधी : आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या पंढरपूर शहराला आता मराठी भाषा संवर्धनासोबतच औद्योगिक विकासाचीही जोड मिळावी, अशी मागणी पुढे येऊ...

कौतुकास्पद…जि.प. प्राथमिक शाळा बंडगरवाडी (नंदेश्वर) च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व मंथन परीक्षेत घवघवीत यश

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बंडगरवाडी येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ तसेच मंथन राज्यस्तरीय...

नंदेश्वर ग्रामपंचायतीची निवडणूक वादळी ठरणार? दुरंगी, तिरंगी की चौरंगी लढत? इच्छुकांनी सुरू केली जोरदार...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीची चाहूल लागताच गावातील राजकीय वातावरण तापू लागले असून, यंदाची निवडणूक चुरशीची आणि वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त...

शिरनांदगी येथे पोलीस बांधवांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न,राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य...

नंदेश्वर / प्रतिनिधी : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिरनांदगी येथे भव्य मिरवणूक काढून गावातील नवनियुक्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषद शाळेच्या...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; इच्छुकांमध्ये उत्सुकता, काहींमध्ये नाराजी

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदस्य पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, चक्रानुक्रमानुसार जाहीर झालेल्या आरक्षणामुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

पंढरपूरच्या सांस्कृतिक वारशासोबत औद्योगिक विकासाचीही गरज; शिवसेना नेते अनिल सावंत यांची उद्योगमंत्री ना. उदय...

पंढरपूर / प्रतिनिधी : आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या पंढरपूर शहराला आता मराठी भाषा संवर्धनासोबतच औद्योगिक विकासाचीही जोड मिळावी, अशी मागणी पुढे येऊ...
error: Content is protected !!