(टीम सोलापूर आजतक)
राज्यभरातील ज्या सर्वसामान्य घटकांकडे आजपर्यंत शासनकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे अशा सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी इंदापूरचे आ. दत्तामामा भरणे यांना कॅबिनेट मंत्री करा अशी मागणी लोहार समाज संघटनेच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी विश्वकर्मा लोहार विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब कळसाईत, धनंजय थोरात, दादासाहेब कळसाईत, चंद्रकांत पवार, जयराम विठ्ठल पखाले सरपंच शिराळे, अजित घाडगे, सचिन हरिहर, सचिन कळसाईत, राहुल कळसाईत, तेजस कळसाईत, बालाजी अंकुश, समाधान टिंगरे, अभिषेक कळसाईत यांनी अजित पवार यांना निवेदन दिले.
दादासाहेब कळसाईत यांच्यासोबत असलेल्या शिष्ट मंडळांने अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली आहे.
आ. दत्तामामा भरणे यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत समाजातील सर्वात दुर्लक्षित जो घटक आहे त्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला आहे. याचा प्रत्यय नुकताच महाराष्ट्र राज्यातील लोहार समाजाला आला आहे.

लोहार समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन व्हावे अशी समाजाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ही मागणी नुकतीच माढा तालुक्यातील टाकळी (टें.) येथे झालेल्या राज्यस्तरीय समाज मेळाव्यात दत्तामामा भरणे यांच्यासमोर मांडण्यात आली.

दत्तामामा भरणे यांनी तात्काळ याविषयी मंत्रालयात बैठक लावून लोहार समाजाचा हा मुख्य प्रश्न मार्गी लावला. फक्त लोहार समाजालाच नाही तर ज्या वंचित घटकांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही त्या सर्व वंचित घटकांना दत्तामामा भरणे यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि भविष्यात देखील फक्त त्यांच्याकडूनच या सर्व वंचित घटकांना अपेक्षा आहेत त्यामुळे अशा या लोकप्रतिनिधीला कॅबिनेट मंत्रीपद द्यावे यामुळे आम्हा सर्व घटकांना न्याय मिळेल अशी आग्रही मागणी लोहार समाजाने निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे






















