महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपण्यापूर्वी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजे छत्रपती यांनी आपले नाव मागे घेतले. त्यामुळे आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार नसल्याने महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना मोकळे मैदान मिळाले आहे.
