Homeताज्या बातम्यामानवाचा उद्धार होण्यासाठी संत संगती अत्यंत महत्त्वाची आहे - बाळासाहेब महाराज

मानवाचा उद्धार होण्यासाठी संत संगती अत्यंत महत्त्वाची आहे – बाळासाहेब महाराज

मानवाचा उद्धार होण्यासाठी संत संगती अत्यंत महत्त्वाची आहे – बाळासाहेब महाराज

नंदेश्वर येथे कै. बाबा सलगर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

नंदेश्वर /प्रतिनिधी
महाभारतामध्ये पांडवांपेक्षा कौरवांची संख्या कितीतरी पटीने जास्त होती पण पांडवांना फक्त कृष्णाची साथसंगत लाभली होती त्यामुळे कमी संख्या असताना देखील पांडवानी कौरवांवर विजय मिळवला. सध्य स्थितीला लोकांचा परमार्थाकडे ओढा कमी होत चालला आहे. पण काहीही झाले तरी मानवाचा उद्धार होण्यासाठी संत संगती खूप महत्त्वाची आहे असे प्रतिपादन नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांनी केले. नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथे कै.बाबा सलगर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित प्रवचन सेवेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब म्हणाले की, अलीकडच्या काळात समाजात वावरत असताना अत्यंत हुशारीने राहणे गरजेचे आहे. कारण समाजात सध्या सल्ला देऊन गार करणारे अनेक सल्लागार आहेत. अशा सल्ल्यांपेक्षा भगवंताच्या चरणी लीन झाल्यास आपोआप मार्ग सापडतील असेही यावेळी बोलताना बाळासाहेब महाराज म्हणाले. यावेळी दिनेश सलगर, विश्वमाऊली दूध संकलन केंद्राचे चेअरमन दामाजी सलगर, डॉ. पांडुरंग सलगर हे उपस्थित होते.

कै. बाबा सलगर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बुधवार दिनांक 30 आणि गुरुवार दिनांक 31 या दोन दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बुधवारी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प‌. चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यानंतर गुरुवार दिनांक ३१ रोजी सकाळी नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण भजनी मंडळाचे सुस्राव्य असे संगीत भजन संपन्न झाले. सकाळी ११ ते १२ या वेळेत बाळासाहेब महाराज यांची प्रवचन सेवा संपन्न झाली. यानंतर दुपारी ठीक बारा वाजता पुष्पवृष्टी होऊन महाप्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

********************
* कै.बाबा सलगर असाधारण व्यक्तिमत्व
कमी शिक्षण होऊन सुद्धा प्रत्येक क्षेत्रातील सखोल ज्ञान असणारे कै. बाबा सलगर हे अत्यंत संयमी, प्रेमळ आणि असाधारण व्यक्तिमत्व होते. इतकेच नाही तर स्वतः कमी शिक्षण घेतलेले असताना सुद्धा मुलांना उच्चशिक्षित करून त्यांनी एक समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला होता असे गौरवोद्गार यावेळी बाळासाहेब महाराज यांनी काढले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा भूषण पुरस्काराने संपादक दिगंबर भगरे सन्मानित, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे दिगंबर भगरे यांचेवर सर्व...

मंगळवेढा / बाबासाहेब सासणे श्री दामाजी संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘मंगळवेढा भूषण’ पुरस्कार दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे यांना प्रदान करून त्यांच्या...

अनाथ व गरीब कुटुंबातील मुलांना शालेय शिक्षणासोबतच वारकरी संस्कारांचे मोफत शिक्षण देण्याचा उपक्रम, नंदेश्वर...

नंदेश्वर / प्रतिनिधी : समाजातील अनाथ, निराधार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार घडविण्याच्या उद्देशाने नंदेश्वर येथे...

कौतुकास्पद…प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने मसनेरवस्ती शाळेत स्पोर्ट्स किटचे वाटप, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून...

नंदेश्वर / प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसनेरवस्ती येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. प्रेरणा स्पोर्ट गारमेंटचे...

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

मंगळवेढा भूषण पुरस्काराने संपादक दिगंबर भगरे सन्मानित, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे दिगंबर भगरे यांचेवर सर्व...

मंगळवेढा / बाबासाहेब सासणे श्री दामाजी संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘मंगळवेढा भूषण’ पुरस्कार दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे यांना प्रदान करून त्यांच्या...

अनाथ व गरीब कुटुंबातील मुलांना शालेय शिक्षणासोबतच वारकरी संस्कारांचे मोफत शिक्षण देण्याचा उपक्रम, नंदेश्वर...

नंदेश्वर / प्रतिनिधी : समाजातील अनाथ, निराधार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार घडविण्याच्या उद्देशाने नंदेश्वर येथे...

कौतुकास्पद…प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने मसनेरवस्ती शाळेत स्पोर्ट्स किटचे वाटप, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून...

नंदेश्वर / प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसनेरवस्ती येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. प्रेरणा स्पोर्ट गारमेंटचे...

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...
error: Content is protected !!