Homeराजकीयपंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ फुटणार ?? पंढरपूर आणी मंगळवेढा असे दोन...

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ फुटणार ?? पंढरपूर आणी मंगळवेढा असे दोन मतदारसंघ होणार, ४८ वर्षांनंतर महाराष्ट्राचा राजकीय नकाशा बदलणार? विधानसभा जागा २८८ वरून ४००च्या घरात, लोकसभा ४८ वरून ७२ होण्याची शक्यता

सोलापूर/ प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडवून आणणारी घडामोड पुढील काही काळात पाहायला मिळू शकते. तब्बल ४८ वर्षांनंतर राज्यातील मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया हाती घेण्याची शक्यता असून, यामुळे विधानसभा आणि लोकसभा जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मोहन पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र नव्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ही संख्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ४०० पर्यंत जाऊ शकते. याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारकडून स्थापन होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना आयोगाकडून घेतला जाईल. त्यामुळे मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ फुटणार असुन पंढरपूर आणी मंगळवेढा असे दोन मतदारसंघ होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्याचप्रमाणे, सध्या महाराष्ट्रात ४८ लोकसभा जागा आहेत. पुनर्रचनेनंतर या जागांची संख्या सुमारे ७२ पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, १९७७ नंतर प्रथमच लोकसभा जागांमध्ये वाढ होणार आहे. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४५ जागा होत्या.

दरम्यान, केंद्र सरकारकडून महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याच्या हालचालीही सुरू आहेत. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी हे आरक्षण लागू करण्याचा विचार असून, यासाठी संसदेच्या विशेष अधिवेशनात तीन महत्त्वाची विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. या आरक्षणाचा परिणाम म्हणूनही जागांची संख्या वाढवावी लागू शकते.
इतिहास पाहता, महाराष्ट्र विधानसभेतील जागांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत गेली आहे. १९६२ मध्ये २६४ जागा, १९६७ मध्ये २७० जागा आणि १९७२ मध्येही २७० जागाच कायम ठेवण्यात आल्या. मात्र १९७१ च्या जनगणनेनंतर १९७८ च्या निवडणुकीत ही संख्या वाढवून २८८ करण्यात आली. त्यानंतर २००६ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाली, पण त्यावेळी केवळ सीमांमध्ये बदल करण्यात आला, जागांची संख्या मात्र कायम ठेवण्यात आली.

आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर पुनर्रचनेची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्याचा संपूर्ण राजकीय नकाशाच बदलू शकतो. नवीन मतदारसंघ, वाढलेले प्रतिनिधित्व आणि महिलांसाठी आरक्षण या तिन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम पुढील निवडणुकांमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बंडू गडदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा होणार सन्मान, जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार जाहीर

मंगळवेढा / प्रतिनिधी : दैनिक दामाजी एक्सप्रेस तर्फे भव्य जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार...

लोकशाहीर दादाभाई शेख यांचे दुर्दैवी निधन, खडकी गावासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावाच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारे, आपल्या शाहिरीच्या दमदार आवाजाने गेली तब्बल ४५ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खडकीचे नाव...

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय...

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय...

शिरनांदगी गुरुकुल संस्थेत अकरावी प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन फॉर्म व संपूर्ण मार्गदर्शनाची सुविधा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथील न्यू इंडियन गुरुकुल आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स ज्युनिअर कॉलेजतर्फे अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेशोत्सव...

बंडू गडदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा होणार सन्मान, जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार जाहीर

मंगळवेढा / प्रतिनिधी : दैनिक दामाजी एक्सप्रेस तर्फे भव्य जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार...

लोकशाहीर दादाभाई शेख यांचे दुर्दैवी निधन, खडकी गावासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावाच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारे, आपल्या शाहिरीच्या दमदार आवाजाने गेली तब्बल ४५ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खडकीचे नाव...

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय...

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय...

शिरनांदगी गुरुकुल संस्थेत अकरावी प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन फॉर्म व संपूर्ण मार्गदर्शनाची सुविधा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथील न्यू इंडियन गुरुकुल आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स ज्युनिअर कॉलेजतर्फे अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेशोत्सव...
error: Content is protected !!