Homeताज्या बातम्यानंदेश्वर केंद्रात श्री बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वरची स्नेहल खापे प्रथम, ओम खांडेकर द्वितीय,...

नंदेश्वर केंद्रात श्री बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वरची स्नेहल खापे प्रथम, ओम खांडेकर द्वितीय, श्री. बाळकृष्ण विद्यालयाचा एस.एस.सी. परीक्षेत दैदिप्यमान यश, विद्यालयाचा निकाल ८९.३२ टक्के

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील श्री. बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या दहावी (S.S.C.) बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. विद्यालयाचा एकूण निकाल तब्बल ८९.३२ टक्के लागला असून विद्यार्थ्यांच्या या यशामुळे नंदेश्वर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नंदेश्वर केंद्रात श्री बाळकृष्ण विद्यालयाचे वर्चस्व
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखत यंदाही घवघवीत यश मिळवले. या परीक्षेत विद्यार्थिनी स्नेहल संभाजी खापे हिने ९३.२० टक्के गुण मिळवत नंदेश्वर केंद्रासह श्री बाळकृष्ण विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तसेच ओम श्रीकांत खांडेकर याने ९१.६० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला.

विद्यालयातील इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सोनाली सुखदेव लवटे — ८८.४०% (तृतीय क्रमांक),आरुषी किसन कसबे — ८५.४०% (चतुर्थ क्रमांक),स्वप्नाली नामदेव गरंडे — ८५.२०% (पाचवा क्रमांक),कोमल दत्तात्रय गरंडे — ८३.२०% (सहावा क्रमांक)
या विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर उज्ज्वल यश संपादन केले असून विद्यालयाच्या लौकिकात भर घातली आहे.

शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन
विद्यालयाच्या या यशामागे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी नियमित सराव परीक्षा, विशेष मार्गदर्शन वर्ग, शंका निरसन सत्र आणि वैयक्तिक लक्ष यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला असल्याचे शिक्षकांनी मार्गदर्शन
केले.

या यशाबद्दल श्री. बाळकृष्ण शिक्षण संस्था, मुख्याध्यापक विठ्ठल एकमल्ली, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच नंदेश्वर ग्रामस्थांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच भविष्यातही विद्यालयाची ही यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशामुळे नंदेश्वर परिसरात समाधानाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...
error: Content is protected !!