मुंबई :
मुंबईत आणखी एका भीषण अपघातात एका निष्पाप मुलाला आपला जीव गमवावा लागला. वडाळा परिसरातील आंबेडकर महाविद्यालयाजवळ शनिवारी भरधाव वेगात येणाऱ्या हुंडाई क्रेटा कारने आयुष लक्ष्मण किनवडे या चार वर्षीय बालकाला चिरडले, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. कार चालवत असलेला १९ वर्षीय संदीप गोळे हा विलेपार्ले येथील रहिवासी आहे. आयुष हा गरीब मजूर कुटुंबातील मुलगा होता आणि फूटपाथवर राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष फूटपाथजवळ खेळत असताना हा अपघात झाला. तेव्हा एका भरधाव कारने त्याला धडक दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अपघाताची अन्य कारणे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
कुर्ला येथे ९ डिसेंबर रोजी झालेल्या भीषण रस्ता अपघातानंतर अवघ्या काही दिवसांतच ही दुःखद घटना घडली आहे. त्या अपघातात बेस्टची (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट) इलेक्ट्रिक बस नियंत्रणाबाहेर जाऊन गर्दीत घुसली, त्यात सात जणांना आपला जीव गमवावा लागला तर ४२ जण जखमी झाले. या अपघातात 20 हून अधिक वाहनांचेही नुकसान झाले आहे.
हे देखील वाचा:
ट्रम्प पनामाचा ताबा घेणार! अमेरिकेला महासत्ता बनवणाऱ्या कालव्याची कहाणी वाचा






















