प्रयागराजमध्ये सोमवारपासून सुरू होणाऱ्या महाकुंभासाठी भारतीय रेल्वेची तयारी वाढवण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी अनेक मोठे उपक्रम सुरू केले. पुढील ४५ दिवसांत या भव्य मेळाव्यात सहभागी होणाऱ्या लाखो यात्रेकरूंना सुरक्षित, अखंडित आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत सेवा देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या प्रेस स्टेटमेंटनुसार, या उपक्रमांमध्ये 24 तास चालणारा कुंभ ‘वॉर रूम’, सर्व लगतच्या स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे, बहुभाषिक संपर्क यंत्रणा आणि अतिरिक्त तिकीट काउंटर इत्यादींचा समावेश आहे. रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि प्रचाराचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी सांगितले की, महाकुंभ कालावधीत 10,000 नियमित गाड्या, 3134 विशेष गाड्या चालवल्या जातील, जे मागील कुंभाच्या तुलनेत 4.5 पट जास्त आहे. 1,869 कमी अंतराच्या गाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.






















