Homeराजकीयरांजणी पंचायत समिती गणातून वैशाली दादासो कळसाईत अपक्ष मैदानात; सर्वसामान्यांचा आवाज बनण्याचा...

रांजणी पंचायत समिती गणातून वैशाली दादासो कळसाईत अपक्ष मैदानात; सर्वसामान्यांचा आवाज बनण्याचा निर्धार

रांजणी / विशेष प्रतिनिधी : माढा तालुक्यातील रांजणी पंचायत समिती गणातून वैशाली दादासो कळसाईत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या उमेदवारीमुळे या गणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उमेदवारी – वैशाली कळसाईत
रांजणी पंचायत समिती गणात भिमानगर, रांजणी, आलेगाव (खु.), रुई आलेगाव (बु.), गारा, खुले, टाकळी, चांदज, आडेगाव आणि वडवली या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांतील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना न्याय मिळावा, विकासाची कामे पारदर्शक पद्धतीने व्हावीत आणि प्रशासन जनतेच्या अधिक जवळ जावे, यासाठी आपण ही निवडणूक लढवीत असल्याचे वैशाली कळसाईत यांनी सांगितले.

सर्वसामान्यांच्या आग्रहाखातर निवडणुकीला सामोरे
वैशाली कळसाईत यांचे पती दादासाहेब कळसाईत हे माढा तालुक्याच्या राजकारणात संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. दादासाहेब कळसाईत आणि वैशाली कळसाईत यांनी आजपर्यंत अनेकवेळा सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवला असून, अनेक प्रकरणांत सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेत सर्वसामान्य नागरिकांच्या आग्रहातूनच वैशाली कळसाईत यांची उमेदवारी पुढे आल्याचे बोलले जात आहे.

टाकळी (टें) ग्रामपंचायतमध्ये प्रतिनिधित्व
स्थानिक स्वराज्य संस्थांतील कामकाजाचा चांगला अनुभवही वैशाली कळसाईत यांच्याकडे आहे. टाकळी (टें.) ग्रामपंचायतीत त्या सलग दोन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या असून, सध्या त्या टाकळी (टें.) ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला व युवकांचे प्रश्न, तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते.

सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यास कटिबद्ध
जनतेशी थेट संपर्क, प्रामाणिकपणा आणि काम करण्याची इच्छाशक्ती हीच माझी ताकद आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी मी कटिबद्ध आहे,असे मत वैशाली कळसाईत यांनी व्यक्त केले. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत असल्या तरी सर्वसामान्य नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि स्थानिक पातळीवरील अनुभव यामुळे वैशाली कळसाईत यांची उमेदवारी रांजणी पंचायत समिती गणात लक्षवेधी ठरत आहे. आगामी निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गंगाबाई करे यांचे दुर्दैवी निधन, अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली केली अर्पण

नंदेश्वर/ प्रतिनिधी : गंगाबाई मारुती (चिमा) करे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. त्या ग्रामपंचायत सदस्य तसेच...

लोहार समाजाच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल; मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रीमंडळाचा लोहार समाजाच्या वतीने...

मुंबई / विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या “ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंदपुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ” या लोहार...

बंडू गडदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा होणार सन्मान, जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार जाहीर

मंगळवेढा / प्रतिनिधी : दैनिक दामाजी एक्सप्रेस तर्फे भव्य जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार...

लोकशाहीर दादाभाई शेख यांचे दुर्दैवी निधन, खडकी गावासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावाच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारे, आपल्या शाहिरीच्या दमदार आवाजाने गेली तब्बल ४५ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खडकीचे नाव...

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय...

गंगाबाई करे यांचे दुर्दैवी निधन, अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली केली अर्पण

नंदेश्वर/ प्रतिनिधी : गंगाबाई मारुती (चिमा) करे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. त्या ग्रामपंचायत सदस्य तसेच...

लोहार समाजाच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल; मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रीमंडळाचा लोहार समाजाच्या वतीने...

मुंबई / विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या “ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंदपुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ” या लोहार...

बंडू गडदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा होणार सन्मान, जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार जाहीर

मंगळवेढा / प्रतिनिधी : दैनिक दामाजी एक्सप्रेस तर्फे भव्य जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार...

लोकशाहीर दादाभाई शेख यांचे दुर्दैवी निधन, खडकी गावासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावाच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारे, आपल्या शाहिरीच्या दमदार आवाजाने गेली तब्बल ४५ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खडकीचे नाव...

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय...
error: Content is protected !!